जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.श्याम देशपांडे यांनी आज दि.३ नोव्हेंबर २०१३ रोजी विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेट दिली.यावेळी विवेकानंद आश्रमद्वारा संचालित सर्व सेवा उपक्रमांना त्यांनी भेटी दिल्या.कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्रींशी विविध विषयांवर चर्चा केली."जनसामान्याचे दुःख दुरू करून त्यांची अहर्निश सेवा करण्याचे महाराजश्रींचे जीवनकार्य ही ईश्वरीसेवाच आहे'असे गौरोदगार त्यांनी काढले.
विवेकानंद आश्रमाचे वतीने त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पू.महाराजश्री रचित ग्रंथ भेट देवून यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते,शशिकांत बेंदाडे,पुरूषोत्तम आकोटकर,उल्हास देशपांडे,डॉ.नितीन पवार उपस्थित होते.
विवेकानंद आश्रमाचे वतीने त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पू.महाराजश्री रचित ग्रंथ भेट देवून यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक थोरहाते,शशिकांत बेंदाडे,पुरूषोत्तम आकोटकर,उल्हास देशपांडे,डॉ.नितीन पवार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment