Wednesday, 4 December 2013

उपाध्यांचे ओझे कमी करा,तुम्ही सुखी व्हाल-प.पू.शुकदास महाराज

येथील विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष कर्मयोगी संन्याशी प.पू.शुकदास महाराजांचा ७० वा वाढदिवस सोहळा मोठया आनंदाने व भक्ती भावाने १ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला.सकाळपासून राज्याच्या कान्याकोप-यातुन आलेल्या हजारो भाविक भक्तांनी विवेकानंद आश्रमात एकच गर्दी केली होती त्यामुळे हिवरा आश्रम परिसर फुलून गेला होता.यावेळी अनेक मान्यवरांनी दिवसभरात महाराजश्रींची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या.सायंकाळी व्यासपीठावर झालेल्या अभिष्ठचिंतन सोहळयाची सुरूवात आश्रमाचे गायक वृंद गजाननदादा निकम,सज्जनसिंग राजपूत,शाहीर ईश्वरदादा मगर,आकाशवाणी कलावंत सुभाष सवडतकर,प्रा.अभय मासोदकर,शशिकांत बेंदाडे यांनी ''ब्रम्हरूपा जय ब्रम्हरूपा शुन्यामधून विश्व निर्मीले हिव-याच्या शुकदासांनी'' या गाण्याने व्यासपीठ दणाणून सोडले. सायंकाळी व्यासपीठावर महाराजांचे अभिष्ठचिंतन करण्यात आले.यावेळी उपस्थिानांना आशिर्वादवर बोलतांना प.पू.महाराजश्री पुढे बोलतांना म्हणाले की,‘‘ कृषि पंपाने ओढल्या गेलेले पाणी,बाहेर फेकल्या गेले पाहिजे,नाहीतर पंप गरम होवून बंद पडू शकतो. सोडलेले पाणी अनाठाई जावू नये, त्याचा उपयोग लोकांना पाणी पिण्यासाठी व शेतीतील उत्पादन वाढीसाठी व्हावा. पैसे कोणीच खात नाही. जास्तीच्या उपभोगाने अनेक रोग जडतात. वाढीव संपत्तीचा उपयोग थोडाफार तरी दुस-यासाठी व्हावा. ‘अंती देहसुद्धा सोबत येवू शकत नाही.पुढे बोलतांना ते म्हणाले की,‘‘एका शतका आतील जगणा-यांनी हजारो वर्षांचा निरर्थक विचार करणे हास्यास्पद आहे! एवढा आटापिटा कशासाठी? तुमच्या चेह-यावरचं हास्य, समाधान, शांती, आनंद, सुख तुम्हीं गमावून बसलेले आहात. कंजुषी आणि मतलबामुळे माणूस समाजातून एकाकी पडतो. उपाध्यांचे ओझे कमी केल्या शिवाय, मनुष्याला ‘मुक्त होता येत नाही. ‘सौंदर्य हे बाहेर असते, आणि आतले असते ते ‘औदार्य!
सध्या ‘मी ज्या देहामध्ये थांबलो आहे, त्यातून बाहेर पडेपर्यंत तुमच्या सेवेत आहेच.आशिर्वचनानंतर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.तसेच वृध्द आश्रमाती २५ वृध्द ,स्त्री पुरूषांना कपडे वाटप करण्यात आले.या वाढदिवस शुभचिंतन सोहळयाचे रसाळ आणि भावपूर्ण तथा अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन गजाननदादा शास्त्री महाराज यांनी केले.त्यानंतर शेवटी दि.२१,२२,२३ जानेवारी २०१४ रोजी संपन्न होत असलेल्या विवेकानंद जन्मोत्सवाच्या उत्सव समितीची सभा संपन्न झाली.
अनेक मान्यवरांनी प.पू.शुकदास महाराजांचे पुष्पहारांनी पूजन केले यामध्ये आ.डॉ.संजय रायमुलकर,माजी मंत्री सुबोध सावजी,माजी आमदार नानाभाऊ कोकरे,रा.का.च्या महिला तालुका अध्यक्ष आशाताई झोरे,जि.प.सदस्य बाळासोहब दराडे,आश्रमाचे उपध्याक्ष अशोक पाध्ये,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त कैलास भिसडे,व्यवस्थापक अशोक थोरहाते,अ‍ॅड किशोर धोंडगे ,प्राचार्य डॉ.एकनाथ पाटील,पवित्रकार,पंढरीनाथ शेळके,जे.डी.सोळंकी,संत शुकदास पत संस्थेचे अध्यक्ष तथा हरिहरतीर्थाचे व्यवस्थापक पुरूषोत्तम आकोटकर,सुनिता गोरे,सौ.संगीता चौधरी,प्रा.प्रशांत पडघान ,जि.के.ठाकरे,मनोज मु-हेकर,उपसरपंच मनोहर गि-हे पाटील,तंटामुक्त अध्यक्ष संजय वडतकर,अशोक गिèहे,डी.पी.मिसाळ,राज्य संघटक संजय दुणगू,अनंत शेळके,शिक्षकपत संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र मोरे,भगवान राईतकर,प्रमोद सावरकर,शशिकांत बेंदाडे,माजी विश्वस्त मा.बा.केंदळे,मंडळाधिकारी विजय पिंपरकर,साळुंके,तलाठी राजेंद्र आव्हाळे ,ग्रामसेवक सदाशिव म्हस्के,माजी सरपंच जगन्नाथ जवंजाळ,मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी धोंडगे,प्रमोद रायमुलकर,प्रकाश रहाटे,सुनिल काकडे संचालक सुधाकर शिंगणे बालरोगतज्ञ मनिष धातरकर,पत्रकार समाधान म्हस्के आदी हजर होते.



No comments:

Post a Comment