Saturday, 18 January 2014

शुकदास महाराज आधुनिक एकलव्य- बिपीनकुमार बिहारी



विवेकानंद आश्रमाचा परिसर मानवी मनाला मोहून टाकणारा आहे,या ठिकाणी सुरू असणारे सर्व सेवा उपक्रम हे समाजाला प्रगतीकडे नेणारे आहेत.एकलव्याने ज्या प्रमाणे द्रोणाचार्याचा पुतळा समोर ठेवून सर्व शौर्य व कौशल्य हस्तगत केले होते त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांची प्रतिमा समोर ठेवून समाजाचे कल्याण हे जीवन ध्येय ठरवून व त्यासाठीचा दृष्टीकोन अंगीकारून शुकदास महाराज काम करित आहेत एकलव्याची स्वामी निष्ठा व एकाग्रता त्यांच्या अंगी आहे म्हणून ते खèया अर्थाने आधुनिक एकलव्यच आहेत.असे उद्गार अमरावती विभागाचे आय.जी.बिपीन बिहारी यांनी विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेट प्रसंगी काढले.यावेळी त्यांचे सोबत जिल्हा पोलीस अधिक्षक शामराव दिघावकर,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय रांगणेकर,साखरखेर्डा ठाणेदार अशोक लांडे हे होते.आश्रमात आगमन प्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.संस्थेचे हरिहरतीर्थ ,विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन त्यांचे महाराजांच्या निवासस्थानी आगमन झाले.महाराजांशी बोलतांना त्यांनी विवेकानंद आश्रमाच्या शैक्षणिक कार्याने ग्रामीण भागातील टॅलेन्ट प्रशासकिय सेवेत येण्यास मदत होईल तसेच संस्थेच्या सेवा उपक्रमामुळे विवेकानंदांना अपेक्षित असलेला निर्भय,सेवाव्रती व दुसèयांचे दुःख जाणून घेणारा संवेदनशिल तरूण निर्माण होईल.असे मत व्यक्त केले.यावेळी त्यांनी विवेकानंद जयंती महोत्सवाच्या शुभेच्छा देत उत्सवादरम्यान शांतता,सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी दक्ष राहावे व्यवस्थापनाला व सहभागी भाविकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,विश्वस्त अशोकभाऊ थोरहाते,के.के.भिसडे,विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment