० विज्ञानाने
जगणे सुलभ होते- स्वामी
शुकदास महाराजश्री
‘विज्ञानाने
मानवसमाजातील दुःख दैन्य दूर करण्यासाठी सामुग्री मिळवता येते. अन्न, वस्त्र,
निवारा
हया गरजा पुर्ण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीला पर्याय नाही.
देशात आरोग्य व कृषी क्षेत्रात झालेल्या बहुमोल संशोधनामुळे जनतेला दोन वेळचे
पोटभर जेवन व रोगमुक्त होण्यासाठी औषधी मिळत आहेत, परंतु गेल्या
काही दिवसापासून शहरी भागात टी.बी. व स्वाईन फ्लू च्या रुग्णांची वाढती संख्या
लक्षात घेता मेडीसीन मध्ये अधिक संशोधनाची गरज आहे. वैद्यकीय शिक्षण घेवून स्वतःचा
टोलेजंग दवाखाना बांधणे व पैसा कमावणे या वृत्तीमुळे संशोधनासारख्या विषयासाठी वेळ
देण्याची कोणाची तयारी नाही. मुलभूत विज्ञान शाखांमध्ये खुप काम करण्याची गरज आहे.
कारण विज्ञान दैन्य, दुःख, उपासमार, रोगराई कमी करु शकते. आवश्यक
सोयी-सुविधा पुरवून जगणे सुलभ करु शकते’, असे विचार विवेकानंद आश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष
कर्मयोगी संत स्वामी शुकदास महाराजश्री यांनी विवेकानंद महाविद्यालयात २८ फेब्रु. रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान
दिन ’ कार्यक्रम
प्रसंगी विद्याथ्र्यांशी बोलतांना व्यक्त केले.
‘पालकांनी मुलांमधील
संशोधक वृत्ती वाढावी व त्यांच्यातील वैज्ञानीक जीवंत राहावा यासाठी मुलांना
प्रयोगासाठी म्हणून लागणा-या सर्व गोष्टी पुरवाव्यात कारण प्रत्येक गोष्टीमागील
कार्यकारण भाव जाणून घेणे हा विद्याथ्र्यांचा हक्क आहे, त्यासाठी
प्रसंगी पालकांनी आपले ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करावा’ असेही त्यांनी सांगीतले. या विज्ञान
दिन कार्यक्रमानिमित्त सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने विद्याथ्र्यांसाठी पोस्टर्स
स्पर्धा आयोजीत केली होती. या स्पर्धेत २५ विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. पोस्टर्स
साठी ‘मायक्रोबायोलॉजी इन इन्डस्ट्री’ हा विषय ठेवला होता. कार्यक्रमाचे
अध्यक्ष स्थानी प्राचार्य जे.डी.सोळंकी होते. याप्रसंगी आश्रमाचे सचिव संतोष गोरे,
विश्वस्त
अशोक थोरहाते, प्रा.डॉ. अशोक पवार, प्रा.मु-हेकर,
प्रा.मालठाणे,
प्रा.मोरे
मॅडम, प्रा.कस्तुरे मॅडम, प्रा.सोळंकी मॅडम, प्रा.गणबास,
प्रा.शेख,
व
विद्यार्थी उपस्थित होते.